Pik Vima List 2025 Maharashtra राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे कारण प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामासाठी विमा कंपन्यांना 7600 कोटी रुपयांचा हप्ता देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याचा शेवटचा देखील हप्ता जमा होणार आहे.
मित्रांनो मागील काही दिवसांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने राज्यात थैमान घातले आणि यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आणि म्हणूनच शेतकरी आता सरकार कडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे आणि त्याच धर्तीवर राज्य सरकारकडून आत्तापर्यंत 6854 कोटी अदा करण्यात आले आहेत आणि उर्वरित रक्कम देखील येत्या दोन ते तीन दिवसात विमा कंपन्या कडे जमा होणार आहे.
Pik Vima Kharif Maharashtra 2024
विम्याबद्दल बोलायचे झाल्यास हप्त्यातून नुकसान भरपाई वगळता शिल्लक राहिलेल्या रक्कम अंतर्गत 20 टक्के रक्कम कंपन्यांचा नफा म्हणून गृहीत धरल्यास राज्य सरकारला याद्वारे सुमारे 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे. हे 2300 कोटी पिक विमा योजनेतून राज्य सरकारचा नफा मिळणार आहे ज्याच्या 2024 प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेअंतर्गत आठ हजार 63 कोटी लाख रुपयांचा एकूण विभाग कंपन्यांना द्यावा लागणार आहे.
यामध्ये अनेक असे बनावट पिक विमा अर्ज देखील होते ज्यांना सरकारकडून रद्द करण्यात आले आहे आणि त्याद्वारे एकूण चारशे कोटी रुपयांची बचत झाली आहे आणि या बचतीमुळे विम्याचे रक्कम देखील कमी झाली आहे. आता या संदर्भात कृषी विभागाकडून देण्यात आलेला प्रस्ताव अर्थ अथवा वित्त विभागाकडे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे आणि हा प्रस्ताव आता मंजूर होऊन येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना शेवटचा पिक विमा योजनेचा हप्ता देखील जमा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.Pik Vima List 2025 Maharashtra
शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई कधी मिळणार ?
अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानाची भरपाई कधी मिळणार असा देखील प्रश्न आता शेतकरी विचारात आहेत कारण यावेळी मान्सूनपूर्व पावसाने मोठ्या प्रमाणावर राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे लोकांन केले आहे यामध्ये फळबागा असतील, कांदा उत्पादक असतील, सोयाबीन असेल त्यासोबत इतरही अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.Pik Vima List 2025 Maharashtra
यामध्ये पंचनामे काही भागाचे पूर्ण झाले असून काही भागाचे पंचनामे देखील अजून बाकी आहेत आणि त्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी आणि ज्या शेतकऱ्यांच्या नुकसान झाले आहे त्यांना सरसकट मदत जाहीर करावी असे देखील शेतकऱ्यांचे मत असून यावर राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. यामध्ये काही शेतकऱ्यांचे असे देखील मत आहे की आता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी जेणेकरून शेतकरी या संकटाला तोंड देऊ शकेल.
