IPL MI vs PBKS Update Marathi आयपीएल मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब सुपर किंग्स यांच्यामध्ये सेमी फायनल मॅच सुरू आहे. यामध्ये नाणेफेक जिंकून पंजाब सुपर किंग्स में सुरुवातीला क्षेत्ररक्षणाची निवड केली आहे परंतु त्याआधीच मुंबई इंडियन्स या संघासाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आहे कारण आता एकही बॉल न खेळता मुंबई इंडियन्स संघ आयपीएलमधून बाहेर होऊ शकतो आणि फायनल मध्ये पंजाब सुपर किंग्स जाऊ शकते आता असे का होणार त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई इंडियन्स या कारणामुळे होणार बाहेर ?
मित्रांनो आजचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद म्हणजेच गुजरात मध्ये ठेवला जात आहे परंतु या सामन्यांमध्ये टॉस झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू झाला आहे. आणि पाऊस असाच सुरू राहिल्यास आणि ही मॅच रद्द झाल्यास यामध्ये उद्या कुठल्याही प्रकारचा रिझर्व डे अर्थातच उरलेली मॅच परत खेळण्यासाठी कोणताही दिवस शिल्लक ठेवला नसल्याने मुंबई इंडियन्सचा संघ बाहेर जाऊ शकतो.
मुंबई इंडियन्सच बाहेर का जाणार तर आयपीएलच्या ग्रुप स्टेजमध्ये पंजाब सुपर किंग चा संघ हा एक नंबर वर राहिला तर मुंबई इंडियन्सचा संघ चार नंबर वर होता आणि त्यामुळेच जर मॅच रद्द झाली तर आपोआप मुंबई इंडियन्स या स्पर्धेमधून बाहेर पडेल आणि पंजाब सुपर किंग परवा दिवशी अर्थातच मंगळवारी होणाऱ्या 03 जून 2025 च्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघासह आयपीएल ची शेवटची म्हणजे ती फायनल मॅच खेळेल.
किमान किती ओव्हर्स चा खेळ आवश्यक असतो ?
मित्रांनो आयपीएलच्या कोणत्याही मॅचचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघाला किमान पाच पाच षटकांचा खेळ करणे आवश्यक असते अन्यथा सदरील मॅच रद्द करण्यात येते. मागील वर्षी आपण पाहिले होते की सेमी फायनल आणि फायनल या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यांसाठी शिल्लक दिवस ठेवण्यात आला होता परंतु यावर्षी त्या पद्धतीने शिल्लक दिवस ठेवला गेला नसल्याने मुंबई इंडियन्स साठी जर पाऊस नाही थांबला आणि सामना रद्द झाल्यास मोठा धक्का बसणार आहे.
डकवर्थ लुईस नुसार मॅच झाल्यास यामध्ये मुंबई इंडियन्सला देखील तोटा होऊ शकतो कारण पंजाब सुपर किंग्स ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतले असल्याने त्यांना किती धाव संख्या करायची आहे याचा देखील अंदाज असणार आहे.IPL MI vs PBKS Update Marathi
मॅच रद्द झाल्यास IPL ला हमखास मिळणार नवीन विजेता
मित्रांनो आजची मॅच रद्द झाल्यास अथवा आजची मॅच पंजाब सुपर किंग्स जिकल्यास आयपीएल ला यावर्षी अठराव्या सीजनमध्ये हमखास नवीन विजेता मिळणार आहे कारण आजवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ने देखील आयपीएल जिंकलेले नाही आणि पंजाब सुपर किंग्जनेदेखील अजून आयपीएल कधीही जिंकले नाही त्यामुळेच आजच्या मॅच कडे संपूर्ण क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून आहे.
तर मुंबई इंडियन्स आजची मॅच जिंकून सहाव्या विजेतेपदासाठी फायनल ला जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत.IPL MI vs PBKS Update Marathi
